✽ कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली आणि कुडाळ देशस्थ गौड ब्राह्मण विद्यावृद्धी समाज आयोजित प्रेरणा परिषद - २०२५ ✽
दि. २९/०६/२५
अहवाल-
शुक्रवार, दि.२७ जून रात्रीच्या कोकणकन्या गाडीने कुडाळ येथे निघालो आणि सकाळी ९.०० च्या दरम्यान कुडाळला उतरलो. सायंकाळी ५.३० वाजता ,मराठा समाज हॉलवरती रविवारच्या कार्यक्रमाबाबत नियोजन करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि सहयोगचे सहकारी मिळून दर वर्षी प्रमाणे व्यासपीठावरील व्यवस्था आणि स्क्रीन कुठे लावायची या बाबत चर्चा झाली. चंद्रकांत ठाकूर यांनी गेटवरील बॅनर लावला तसेच वह्या वाटप व्यवस्था करून ठेवली. स्थानिक कार्यकर्त्यांपैकी प्रफुल्ल वालावलकर, वल्लभ सामंत, स्वाती वालावलकर, सामंत मॅडम, दिपक सामंत, पुर्वा नाईक,संजय ठाकूर,तृप्ती प्रभुदेसाई इत्यादी कार्यकर्ते हजर होते. तर सहयोगचे कार्याध्यक्ष गणेश देसाई ,कार्यवाह भिकाजी वालावलकर, संजय देसाई, चंदू ठाकूर, ठाण्याचे महेश राळकर, बाबू वालावलकर,मंगेश कोचरेकर ईत्यादी कार्यकर्ते हजर होते. रविवारचे नियोजन योग्य झाले याची खात्री होताच दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता भेटायचे ठरवून सर्व निघाले.
रविवारी २९ जून रोजी ९.१५ ला पाहुण्यांचे आगमन झाले.त्यांचे सभागृहात आगमन होताच, जन गन मन राष्ट्रगीतानी सुरवात झाली, महाराष्ट्र राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताची धून वाजवण्यात आली.
त्यानंतर कुमारी अर्चिता अमेय सामंत हिने तिच्या सुंदर नृत्य आविष्कारातून गणेश वंदना सादर केली.
कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या संस्थेच्या दोन मान्यवर कुडाळदेशकर विद्यावृद्धी संस्थेचे कार्यवाह संजय सामंत याच बरोबर कुडाळ शहरातील उद्योजिका श्रीमती शैला सामंत यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले, संजय सामंत गेले ११ वर्षे प्रेरणा परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमात आपल्या होतकरू विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित राहात होते. तसेच शहरातील उद्योजिका श्रीमती शैला सामंत यांचे कुडाळदेशकर महिला संघटनेत भरीव योगदान आहे. त्यांनी कित्येक तरूण तरुणींचे विवाह जुळवले आहेत. कोचरेकर यांनी सभागृहातील उपस्थितीतांना विनंती केली की सर्वांनी या दोन्ही मान्यवरांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून जाग्यावरच दोन मिनीटे शांत उभे राहून ईश्वराकडे प्रार्थना करावी. त्याप्रमाणे सर्वांनीच जाग्यावरच शांत उभे राहून श्रध्दांजली अर्पण केली.
यानंतर आजचा प्रेरणा परिषद आणि सत्कार समारंभ याचे प्रास्ताविक मंगेश कोचरेकर यांनी केले. गेल्या दहा अकरा वर्षात या व्यासपीठावरून कोचरेकर यांनी प्रेरणा परिषदेच्या मागचे उद्दिष्ट काय? त्याबाबत आपले मत मांडले.
आजपर्यंत आपण , माध्यम तज्ञ केतन जोशी,समुद्र वैज्ञानिक नरसिंह ठाकूर, कृषी क्षेत्रात काम करून स्वतःच्या शेतात सोन पिकवणारे वरद सामंत, बांबू शेतीत करिअर करणारे मिलिंद पाटील आणि एक होता कार्वरच्या लेखिका श्रीमती विणा गवाणकर यांचे विचार ऐकले आहेत. गेल्या वर्षी परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंह यादव यांचे सैन्यातील जीवन कसे असते ते ही ऐकले. मान्यवरांच्या भाषणातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. या वर्षी या प्रेरणा परिषदेचे १२ वे विचार पुष्प मा. चिन्मय गवाणकर गुंफणार आहेत. असे कोचरेकर यांनी सांगितले.
येथील विद्यार्थ्यांना चांगल्या वक्त्यांचे विचार ऐकता यावेत आणि विद्यार्थांनी त्यातून प्रेरणा घ्यावी,आपले भविष्य उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर, प्रेरणा परिषदेच्या पाच महिला कार्यकर्त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते चिन्मय गवाणकर आणि सहयोग उपाध्यक्ष विनय तिरोडकर यांचे स्वागत औक्षण करून केले. या कार्यक्रमास मा. कार्यवाह भिकाजी वालावकर उपस्थित होते. चिन्मय गवाणकर यांनी स्वामी पूर्णानंद यांच्या प्रतिमेला फुले वाहून आशीर्वाद घेतले. सहयोगचे उपाध्यक्ष तिरोडकर यांनी पाहुण्यांचे स्वागत शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केले.
या कार्यक्रमाच्या दरम्यान,’हिच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे’ ही गीतकार समीर सामंत यांची प्रार्थना, गीतकार सुमीत्रा भावे यांची, ‘तू शुध्दी दे तू बुध्दी दे.’साने गुरूजी यांची, ‘ आता उठवू सारे रान,आता पेटवू सारे रान.’ आणि मन सुध्द तुज गोस्त आहे पृथ्वी मोलाची हे कुंकू चित्रपटातील गाणे ,अशा सुंदर प्रार्थना ऐकवून विद्यार्थ्यांना एका वेगळ्याच वातावरण घेऊन गेली.
वक्ते चिन्मय गवाणकर यांनी या कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा? या विषयी मार्गदर्शन करतांना अनेक टीप्स दिल्या. एकाच ठराविक जागी बसून अभ्यास करु नये, एका दिवशी किंवा एका ठराविक काळात फक्त एकाच विषयाचा अभ्यास करू नये हे सांगताना त्याचे तोटे विषद केले.
आपल्याला एका ठराविक ठिकाणीच बसून अभ्यास करायची सवय लागली की, परीक्षा काळात आपली बैठक व्यवस्था बदलल्याने आपण अनीझी होतो,मानसिक दृष्ट्या आपली नेहमीची जागा आपण मिस केली असे वाटून आपला फोकस बदलतो. ज्याचा परिणाम आपल्या लिखाणावर होतो असे गवाणकर म्हणाले.
याच बरोबर एकच विषय आपण एकाच वेळी संपवण्याचा प्रयत्न केला तर ते टास्क थोडे अवघडही होते, मुख्य म्हणजे आपण पुन्हा तो विषय अभ्यासाला घेतो तोपर्यंत बरेच दिवस निघून जातात. परिणामी आपल्याला ते रिकलेक्ट करायला,आठवायला बरेच श्रम घ्यावे लागतात, म्हणून एका वेळेस एक विषय संपवण्या ऐवजी विषयात बदल हवा,त्याच बरोबर अभ्यास करतांना काही ठराविक काळानंतर ब्रेक घेणे किंवा वेगळा विचार करणे गरजेचे असते कारण आपला अटेंशन पिरड हा ७ ते ७.५ मिनीटांपेक्षा जास्त नसतो. गवाणकर यांचा हा निष्कर्ष एकदम योग्य आहे.
मुख्य म्हणजे अभ्यास करताना सतत अभ्यास केल्यास आकलन होण्यापेक्षा विस्मरण होण्याची शक्यता अधिक वाटते. गवाणकर यांनी सांगितलेली ट्रिक्स यापुढे विद्यार्थी नक्कीच वापरतील.
चिन्मय गवाणकर यांनी सांगितलेली चवथी गोष्ट, म्हणजे, एक एकटे बसून अभ्यास करण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनी विषय किंवा धडे किंवा उदाहरण संग्रह विभागून घेऊन अभ्यास केला. ज्या विषयात ज्याला चांगली गती असेल त्याने त्या नंतर आपल्या मित्रांना तोच विषय एक्सप्लेन केला तर इतर मिंत्राना तो विषय नक्की समजेल आणि समजावून सांगणाऱ्या मित्राला तो विषय अजूनही सोप्पा होईल. तेव्हा अभ्यास कसा करावा ? या विषयी ज्या ट्रिक्स जे तंत्र आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगितले त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. गवाणकर यांचे पहिल्या सत्रातील , एक तासापेक्षा जास्त वेळ चाललेले भाषण विद्यार्थ्यांनी अतिशय शांततेने आणि एकाग्रतेने ऐकले याचा अर्थ त्यांना ते मनापासून भावले.
गवाणकर यांनी, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टिप्स दिल्या. इंजिनिअरिंग, मेडिकल हे उच्चशिक्षिण घेतांना मोठमोठी पुस्तके एकट्याने अभ्यासण्यापेक्षा, विद्यार्थी मित्रांचा गट केला आणि विषय विभागून अभ्यास केला तर, तो अभ्यास करणे कसे सोप्पे होते? आणि एकमेकांच्या सहकार्याने अभ्यासाचा भार कसा हलका होतो ? ते म्हणणे अनेकांना रूचले असेल . भविष्यात आपले विद्यार्थी आपली ट्रिक्स वापरून यशस्वी होतील.
दुसऱ्या सत्रात गवाणकर यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता ( AI ) म्हणजे नक्की काय? हे सांगताना, मेंदू ज्या गोष्टी करू शकतो त्या गोष्टी कंप्यूटर सहजपणे करू शकत नाही. त्याला आज्ञावली द्यावी लागते तरच तो काम करतो. कंप्यूटर पेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता
( AI) चा वापर भविष्यात आपल्याला जास्त अचूक निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त करून देईल.याचे कारण आपल्याला पडणाऱ्या शक्य त्या प्रश्नांची माहिती त्यात साठवली आहे. आपण शेकडो वर्षे AI वरील माहिती वाचून किंवा पाहूनही ती पूर्णपणे पाहू,वाचू शकता नाही इतका quantam प्रचंड आहे अशी माहिती त्यांनी दिली.
अर्थात ज्या शास्त्रज्ञांनी, AI तंत्र विकसित केले त्यांनी AI जवळून आपल्याला अचूक मार्गदर्शन व्हावे यासाठी त्याला विचारायची माहितीही विस्तृतपणे कशी द्यावी? ते उदाहरणासह सांगितले.
AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा जडजंजाळ शब्द नाही,पण लोक उगाचच बाऊ करतात. गवाणकर म्हणाले, आपल्याला AI बनवायचे नाही, संशोधन करायचे नाही तर जसा आपण मोबाईल निर्माण करू शकत नाही पण सहजपणे हाताळतो,वापरतो त्याच प्रमाणे आपण सगळे या सभागृहातून बाहेर जाण्यापूर्वी AI शिकून बाहेर पडणार आहात याची खात्री बाळगा. कदाचित गवाणकर सांगत आहेत ते कस शक्य आहे ? हा प्रश्न आम्हाला तर फक्त ऐकूनच माहिती आहे ,असे सर्व श्रोत्यांना वाटले असावे.
मात्र AI ला योग्य माहिती दिली तर तो आपल्याला अपेक्षित असा सगळ्यात योग्य किंवा अचूक मार्ग सांगतो किंवा उत्तर देतो हे आपण आपली टूर कशी आखावी?, फ्रीज मधल्या उपलब्ध साहित्यातून विविध पदार्थ कसे बनवावे? ज्वेलरी खरेदी करताना आपल्याला मनपसंत ज्वेलरी मिळावी म्हणून एखादा पाहिलेला फोटो AI मार्फत दाखवून आपण ज्वेलरीसाठी योग्य दुकान कसे निवडू शकतो अशी अनेक व्यवहारिक उदाहरणे देत सांगितले.
ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे ते AI चा परिणामकारक वापर सहज करू शकतात हे समजावून सांगितले. गवाणकर यांनी हे विषय मांडताना व्यवहारिक उदाहरणांची विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगड घालून दिल्याने त्यांचे भाषण सर्वांना मनापासुन आवडले हे श्रोत्यांच्या प्रतिक्रिया किंवा feedback मधून समजले. भविष्यात विद्यार्थी तसेच पालकही चांगल्या विषयाची महितो घेण्यासाठी कृत्रिम बुध्दीमतेचा वापर करतील याची खात्री वाटते. गवाणकर यांचे कृत्रिम बुद्धिमतेवरील भाषण इतके प्रभावी झाले की त्यांचे भाषण संपताच टाळ्यांनी सभागृह दणाणून गेले. काही विद्यार्थी आणि पालकही त्यांना भेटण्यासाठी आतुर होते.
गवाणकर यांच्या व्याख्यानानंतर प्रेरणा परिषदेमार्फत दोन व्यक्तींचा गौरव करण्यात आला.शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी दिला जाणारा शिक्षणतज्ञ रामभाऊ परूळेकर आणि मुख्याध्यापक, कै. बाबूराव परूळेकर पुरस्कार मालवण येथील प्रसिद्ध टोपीवाला शाळेच्या संस्थेचे कार्यवाह विजय कामत यांचा प्रमुख पाहुणे श्री.चिन्मय गवाणकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आले.
तत्पूर्वी त्यांचा परिचय कुडाळ तालुक्याचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, बिडिओ प्रफुल्ल वालावलकर यांनी विजय कामत यांचा परिचय करून दिला. विजय कामत हे टोपीवाला विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, त्यानी भुदरगड पतसंस्थेत पिग्मीचे काम केले होते,त्यानंतर ते लोकमान्य पतसंस्थेत कार्यरत आहेत आणि गेले दहा वर्षे टोपीवाला संस्थेचे कार्यवाह पद यशस्वीपणे सांभाळत आहेत.
कोचरेकर यांनी, कामत यांची थोडक्या शब्दात ओळख करून दिल्याबद्दल प्रफुल्ल वालावलकर यांचे आभार मानले.
या वर्षीचा , प्रेरणा परिषदेचा दुसरा ,कामगार नेते डॉ. कै.दत्ता सामंत सामाजिक कार्य पुरस्कार - २०२५, डोंबिवली मधील पहिले सिए ,लेखा परीक्षक श्री. डी.ए.पाटकर जे ग्लॅक्सो कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते यांना दिला जाणार आहे. आज त्यांचे वय वर्ष ९६ असुनही ते महिलांना होणाऱ्या कॅन्सर बाबत जागृती मोहीम राबवत असतात. ते वयोवृद्ध असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. या कार्यक्रमानंतर मुबंई येथे जाऊन प्रेरणा परिषद कार्यकर्ते त्यांचा उचित सत्कार करतील असे निवेदक कोचरेकर यांनी सांगितले.
कामत सर यांनी मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या आजवरच्या वाटचालीविषयी सांगितले. टोपीवाला शैक्षणिक संस्थेत कार्यवाह म्हणून काम करण्याची संधी मला माझ्या गुरूस्थानी असणाऱ्या सामंत सर यांनी दिली त्यामुळे मी या संस्थेत निरपेक्ष बुद्धीने काम करू शकलो ,माझ्या या कार्यात माझ्या पत्नीची मला चांगली साथ मिळाली म्हणूनच ते शक्य झाले. या सन्मानासाठी मला निवडले त्याबद्दल ,मी कुडाळदेशकर सहयोगचा आभारी आहे असे विजय कामत म्हणाले.
मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीतील , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, कुडाळसह चार पाच तालुक्यातील इयत्ता १०वी मधील ८०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या ३२ विद्यार्थ्यांचा तसेच १२ वी मधील ७०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या २२ विद्यार्थ्यांचा आणि पदवी प्राप्त केलेल्या ०८ विद्यार्थ्यांचा सत्कार ,श्री.बाळासाहेब पंत वालावलकर,मालवण, श्री.सुरेश सामंत, फोंडाघाट, श्री.डि.ए.सामंत,पाट, प्रा.राजेंद्र ठाकूर,उत्तुर, पत्रकार चंद्रकांत सामंत आणि डॉ.प्रशांत सामंत,परूळे , श्री.भिकाजी वालावलकर (कार्यवाह) , श्री.बाबुराव वालावलकर , श्री.विनय तिरोडकर (उपाध्यक्ष) , सहयोग डोंबिवली आणि सौ.स्वाती वालावलकर सेवानिवृत्त शिक्षिका, कुडाळ या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सत्काराला, ‘अपुर्वा अमित देसाई’ हिने उत्तर दिले.ते तिच्या शब्दात, “ गेल्या वीस वर्षापासून मी अनाम प्रेम या संस्थेची जोडलेली आहे ही संस्था दिव्यांग मुलांसाठी विविध राज्यात प्रोग्राम आयोजित करते त्यातूनच प्रेरणा घेऊन मी दिव्यांग क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यावं असं ठरवलं आणि बारावीनंतर दिव्यांग क्षेत्रामध्ये डिप्लोमा केला आणि सोबतच यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं .
त्यानंतर ह्याच क्षेत्रामध्ये पुढील शिक्षण घ्यायचं असं ठरवून मथुरा येथे स्थित संस्कृती युनिव्हर्सिटीमधून लर्निंग डीसाबिलिटी ह्या क्षेत्रामध्ये पदवी प्राप्त केली आणि सोबतच जॉब करत स्वतःचे शिक्षण पूर्ण केलं .
त्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया , दिल्ली .या सेंट्रल युनिव्हर्सिटी मधून ह्याच क्षेत्रांमध्ये मास्टर्स पूर्ण केलं आणि सोबतच इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी मधून सायकॉलॉजी मध्ये मास्टर्स केलं हे शिक्षण मी स्वतःच्या हिमतीवर जॉब करत पूर्ण केलं
सध्या मी दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या व्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये लेक्चरर या पदावर कार्यरत आहे जिथे मी दिव्यांग मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देते. डिसेबिलिटी क्षेत्रामध्ये मी दोन रिसर्च पेपर आणि असीसमेंट अँड आयडेंटिफिकेशन ऑफ लर्निंग डिसेबिलिटी हे पुस्तकही प्रकाशित केलंय.
तिचा शैक्षणिक प्रवास आणि समाजातील दुर्लक्षित घटकांबद्दल कणव,जिव्हाळा, प्रेम पाहून प्रेक्षकांनी भरभरून टाळ्या वाजवून तिचा गौरव केला.
यानंतर सभागृहात जमलेल्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन आणि आनंदात सर्वांनी प्रेरणा परिषदेचा निरोप घेतला.
क्रम